Monday 26 November 2018

गोंधळीः आर. व्ही. रसेल (1916) यांच्या मते......

गोंधळीः आर. व्ही. रसेल (1916) यांच्या मते......

"द ट्राईब्स ॲण्ड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया"  हे रॉबर्ट व्हेन रसेल यांचे ऐतिहासिक व जागतिक दर्जाचे गाजलेले पूस्तक आहे. या पूस्तकात रसेल यांनी ब्रिटीश भारतातील सेंट्रल प्रोव्हीन्सेस ऑफ इंडिया म्हणजेच आताच्या मध्यप्रदेश व विदर्भ, मराठवाडा मधील विविध जाती व जमातींची माहिती या पूस्तकात दिली आहे. रॉबर्ट व्हेन रसेल हे एक जगप्रसिध्द लेखक व अधिकारी होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1873 रोजी झाला व ते 30 डिसेंबर 1915 रोजी म्रूत्यू पावले. त्यांचे हे पूस्तक 4 खंडात उपलब्ध आहे. त्यातील खंड 3 मध्ये मध्य भारतातील गोंधळी व इतर जाती जमातींची माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे पूस्तक त्यांच्या मू्त्यूनंतर सन 1916 मध्ये मॅकमिलन व कंपनी लिमीटेड सेंट मार्टिन स्ट्रीट लंडन यांनी प्रकाशित केले. रसेल हे  1901 च्या भारतीय जनगणनेचे अधिक्षकही होते. त्यांच्या सोबत राय बहादूर हिरालाल हे ही सहाय्यक म्हणून होते. द ट्राईब्स ॲण्ड  कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया हे पूस्तक इंटरनेटवर इंग्रजी मध्ये ई-बूक स्वरूपात उपलब्ध आहे. या पूस्तकातील गोंधळी जातीचे केलेले वर्णन मी वाचले व एका इंग्रज लेखकाने 100 वर्षांपूर्वी इंग्रजीमध्ये काहीतरी लिहीले आहे याने मी भारावून गेलो व माझ्या जात बांधवांनाही हे माहित व्हावे, वाचायला मिळावे म्हणून याचे मी मराठीमध्ये भाषांतर करायचे ठरवले जे आपणा समोर सादर करत आहे. हे भाषांतर करत असतांना मी माझ्या मनाचे यात काहीही समाविष्ठ केले नाही. तसेच मूळ लेखनातील काहीही वगळले नाही. केवळ काही शब्दांचे अर्थ जे जूने वेगळे होते व नवीन वेगळे आहेत ते समाविष्ठ केले आहेत. तसेच काही शब्दांचे स्पष्टीकरण तर काही शब्द समूहांबददलचे शब्द देखील आपल्या आकलन सूलभतेसाठी समाविष्ठ केले आहेत.

     या पूस्तकात रसेल म्हणतात की, गोंधळी ही भारताच्या मध्य प्रांतातील (मध्यप्रदेश) व वरार (व-हाड) मधील मराठा जिल्हायांतील भटक्या, भिक्षूक व संगितकारांची जमात आहे. गोंधळी हा शब्द मराठीतील गोधरणे या शब्दापासून तयार झाला आहे ज्याचा मूळ अर्थ आवाज किंवा गोंगाट करणे असा होतो. 1911 च्या जनगननेत गोंधळी लोकसंख्या बेरार मध्ये 3000 तर मध्य प्रांतात 300 आढळून आली. ही जमात बॉम्बे प्रांतात देखील आढळून येते. जातीची उत्पत्ती स्पष्ट नसली तरी वाघ्या आणि मूरळींच्या संततीतून किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी मंदीरांना वाहीलेल्या मूलामूलींमधून अस्तीत्वात आली असावी. श्री. किटस यांनी 1881 च्या बेरार जनगनना अहवालात नमूद केले आहे की, गोंधळी हे तूळजापूर येथील तूकाईच्या मंदीराशी किंवा माहूर येथील रेणूका मंदीराशी जोडलेले आहेत. हा मजकूर प्यारेलाल मिश्रा यांच्या मानववंशशास्त्राच्या श्री. केशवराव जोशी लिपीक हेडमास्टर सीटी स्कूल, नागपूर यांनी लिहीलेल्या कागदपत्रातून संकलीत केला आहे.

     गोधळी जातीच्या कदमराई व रेणूराई या उपजाती आहेत. ज्या आपसात विवाह करीत नाहीत. मध्य प्रांतामध्ये या दोन उपजातींशिवायही अनेक उपजाती देखील आहेत. त्यांच्यापैकी बहूतेक विशिष्ठ जातींची नावे आहेत आणि त्यात स्पष्टपणे या जातींच्या सदस्यांचा समावेश आहे. जे पूढे गोंधळी अथवा गोंधळयांचे वंशज बनले. अशा प्रकारे उपजातींची नावे ब्राम्हण गोंधळी, मराठा गोंधळी, माने गोंधळी, कुणबी गोंधळी, खैरे गोंधळी, तेली  गोंधळी, महार गोंधळी, मांग गोंधळी, अशी आहेत. विदूर गोंधळी देखील आहेत! त्याच बरोबर काही देशकरांमधून काही दख्खनमधून तर काही गंगेपलीकडून आलेले आहेत. काही हिजडे व नपूंसक देखील गोधळी बनले. म्हणूनच हे स्पष्ट आहे की, या जातींचे सदस्य गोधळी बनतात आणि त्यांचे विवाह त्यांच्या स्वतच्या जातीच्या तसेच इतर जातीधर्मांतून आलेल्या लोकांसोबत होतात. त्यामूळे त्यांचे नात्यांचे सामाजिक स्थान निश्चित होते. सर्व गोधळयांना सैद्धांतिक‍दृष्ट्या समान मानले जाते परंतू असे असले तरी त्यांच्या मूळ पायांवरच त्यांचे स्थान निश्चित होते व म्हणून जातीची सामाजिक भावना त्यांच्या या धारणेस परवानगी देण्यास खूपच कठोर असते व म्हणूनच हे समाधानी असतील की नाही याबाबत शंका आहे.

    कुणबी गोधळी सामान्य कुणब्यांकडून अन्न  घेउू शकतात परंतू ते भिक्षूक असल्यामूळे त्यांचा दर्जा कनिष्ठ असतो. त्यांच्या खालचा असतो. जातींमध्ये अनेक गट व गोत्र आहेत ज्यांची नावे अनुवंशावरून व प्रादेशिकतेवरून वर्गीकृत केली जातात. उदा. डोकीफोडे ज्यांनी भिक्षा मागताना डोकी फोडलेली असतात, सूक्ते जे सडपातळ वा कमकूवत असतात, मूके जे मूक असतात, जबल ज्यांचे जोग्यांसारखे लांब केस असतात व पाचंगे ज्यांना पाच अवयव असतात. मुलींचा विवाह नियम असल्याने त्याप्रमानेच किशोर अवस्थेपूर्वीच केला जातो. विवाह कुणब्यांप्रमाणेच सामान्य विवाहांप्रमाणेच होतात मात्र रेणूका देवीची विशेंष प्रार्थना केली जाते आणि मूलाला जातीच्या पाच विवाहीत पूरूषांकडून कवडयाची माळ परिधान केली जाते. जोवर हे होत नाही तोवर त्याला गोधळी मानले जात नाही. ब्रम्हचर्य हे आदेशाचा सिध्दांत नाही. विधवांच्या पूर्नविवाहास परवानगी आहे. पूरूषांकडून स्त्रिच्या गळयात काळया मण्याची माळ परिधान केली जाते आणि स्त्रीकडून पूरूषाला पायात घालण्यासाठी एक बूटाची जोडी दिली जाते. दुसरी पत्नी आपल्या पतिच्या पहिल्या पत्नीची चांदीची किंवा सोन्याची प्रतिमा आपल्या गळयात सतत परिधान करते आणि जेवण्याआधी त्या प्रतितेचे पूजन करते. तसेच तिच्या पतीसोबत झोपण्यापूर्वी तिला परवानगी मागीतली जाते. या जातीत देवी भवानी अत्यंत आदरणीय आहे आणि तीच्या सन्मानार्थ श्रध्देने मंगळवारी व शूक्रवारी उपवास केला जातो. ते त्यांची संगीत वादये दस-याच्या दिवशी पूजतात आणि देवीला बोकडाचा नैवेदय अर्पण करून रात्रभर गातात व नाचतात. हा त्यांचा मूख्य उत्सव आाहे.

    ते अश्विन महिन्यात सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 9 दिवसांचे उपवास करतात आणि ज्वारी किंवा गव्हाची घरात देवीसमोर उगवण करतात. गोंधळी भिक्षूक संगीतकार आहेत. ते लगीनसराईत उच्च जातींमध्ये विवाहप्रसंगी नृत्यांसह गोधळ साजरा करतात. गोधळासाठी चार माणसे आवश्यक असतात. त्यातील एक लांब, लाल किंवा पांढरा झगा घालून डोक्यावर कापडी पगडी बांधून पायात घूंगरे बांधून व गळयात कवडयाची माळ घालून नृत्य कला गाण कला सादर करतो. तर इतर तीन त्याच्या मागे उभे रहातात. त्यातील दोघे संभळ तुणतूणे वाजवतात तर एक जण हातात पवित्र मशाल घेवून उभा रहातो जिला डिवटी म्हणतात. हा डिवटी घेतलेला माणूस त्या नृत्य गान सादर करणा-या माणसासाठी विनोद थट्टा मस्करी सादर करतो. त्यांची वादये म्हणजे एका उघडया डब्याला लांब काठीच्या खाली धातूची तार जोडलेली असते जी एका लहान लाकडी पिनेला बांधलेली असते आणि दोन लहान धातूचे ढोल जे खालच्या बाजूने लाकडी खूंटयांना जोडलेले असतात. या दोन ढोलांमधील एक ढोल भद्द वाजतो तर एक ढोल तिक्ष्ण वाजतो. गोंधळात देवी भवानीच्या सन्मानार्थ नृत्य सादर केले जाते.

     कला सादर करावयाच्या व्यासपीठावर एक लहान लाकडी स्टूल उभा केला जातो त्याच्यावर एक कापड आंथरून त्यावर गहू पसरवला जातो व त्यावर एक तांब्याचे भांडे ठेवले जाते. त्यात पाणी टाकले जाते, बाजूने पाने ठेवून त्यावर नारळ ठेवले जाते. हे देवीचे रूप दाखविते. गोंधळाचे सादरीकरण झाल्या नंतर गोंधळी पूजेचे साहित्य घेवून जातात आणि नारळ व गहू खावून टाकतात. त्यांची सामान्यपणे फी एक ते चार रूपये असते या शिवाय पाहूने लोक त्यांना काही पैसे बक्षीस म्हणूनही देतात. गोंधळी लोक विवाह मूलामूलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम म्हणजे, शांती, आणि मूलगी वयात आल्यानंतरचा कार्यक्रम आणि इतर धार्मीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमात व्यस्त असतात.

     त्यांच्या गोंधळात स्टूल, गहू, पाने, तांब्याचे भांडे, नारळ हे देवीचे रूप म्हणून अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यांच्या गान्याचा नमून असा असतो, मी कोण आहे ,मी कोठून आलो, हे एक गूढ आहे जे कोणीही सोडवू शकला नाही. आई, वडिल, बहिन, भाऊ  हे सर्व मायाजाल आहे. मी त्यांना माझे मानतो आणि माझ्या स्वार्थात हरवून जातो. जगातील जिवन हे नरकाची सूरूवात आहे. माणसाने यात स्वताला अकारण गूरफाटून घेतले आहे. तूमच्या गूरूला विसरू नका. त्याचे चरनस्पर्श करा. दया , करूना, व अनूकंपेची ढाल बाळगा व ज्ञानाची तलवार हाती घ्या. प्रत्येक मानवी शरिरात देव आहे.

    अंगात लांब लाल झगा परिधान करून ही जात पहाटेपासून दूपारपर्यंत भिक्षा मागते.  त्यांचा सामाजिक दर्जा काहीसा कनिष्ठ असला तरी ते बहूदा साधे व प्रामाणिक असतात. माणूस त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी आपली जात नसोडताही गोंधळी बनू शकतो. त्यानंतर त्याचा गोंधळी म्हणून आरंभ होतो व त्याला कवडयाची माळ दिली जाते. प्रत्येक मंगळवारी तो ती परिधान करतो व देवीच्या सन्मानार्थ पाच घरी भिक्षा मागतो. या व्यतीरिक्त इतर वेळी तो स्वताची जात धारण करून सामान्य व्यवहार करू शकतो. 

     गोंधळी हा मराठी भिक्षूक संगीतकार आणि नर्तक लोकांचा वर्ग आहे जो मराठवाडयाच्या सर्व जिल्हयात आढळतो परंतू विशेषत्वाने तो उस्मानाबाद जिल्हयात आढळतो. ते त्यांच्या व्यावसायिक नृत्यांमधून म्हणजेच गोंधळामधून नावे घेतात. गोंधळी या शब्दाचा उगम गोंधळ या शब्दापासून झाला आहे. गोंधळी नृत्य करताना राजी रं जी जी असा सतत जप करतात. त्यांची परंपरा अशी मानते की, त्यांची उत्पत्ती रूषी जमदाग्नी व रेणूका यांच्या पासून झाली आहे. दूस-या एका मतानूसार ते प्राचिन मैत्र्यांप्रमाणेच आहेत. ज्यांना वैदहीका पिता व अयोगवा माता यांचे वंशज मानले जाते.

     गोंधळी जात ही दोन उपजातींमध्ये विभागली गेली आहे, कदमराई व रेणूराई जे एकत्र विवाह करत नाहीत अथवा एकत्र खातही नाहीत. या दोघींचे पहेरावही भिन्न आहेत. एक गळयात कवडयाची माळ घालतात तर दूसरे देवीची मूर्ती गळयात बांधतात मात्र दोघीही देवीच्या भक्त आहेत. देवी जी शिवाची पत्नी आहे. कदमराई  गोंधळी देवीच्या पायात भिक्षा मागतात जो विशेष अधिकार मानला जातो जो रेणूरायांना नाही. याशिवाय एक तिसरा वर्गही आहे गोंधळयांचा ज्यांना अकरमाशी म्हटले जाते. हा कदाचित कदमराई व रेणूराई गोंधळयांचा अनौरस संततीचा असावा. गोंधळी हा मराठा कुणब्यांचाच एक स्वतंत्र गट असावा जो त्यांच्या पासून आपल्या भिक्षा मागण्याच्या निवडलेल्या व्यवसायामूळे वेगळा झाला असावा. पूरूष त्याच्या स्वताच्या वंशातील मूलींशी विवाह करू शकत नाही. आपल्या बहिनीच्या मूली, त्याच्या वडीलांच्या बहिनीच्या व आईच्या भावांच्या मूलींशी विवाह करू शकतो. बायका किती असाव्यात याची मर्यादा नसल्याने त्याला बहूविवाहांची परवानगी आहे.

     गोंधळी मूलींचे विवाह त्यांच्या बालपणी अथवा प्रौढपणी वयाच्या 3 ते 16 मध्ये होतात. मूलीच्या वडीलाला 25 ते 200 रूपयांपर्यंतची किंमत वर पक्षाकडून मिळते. विवाह सोहळा 5 दिवसांपर्यंत वाढतो आणि तो मराठी जातीतील विवाहांसारखाच असतो. पहिल्या दिवशी वधू आणि वराला त्यांच्या स्वताच्या घरीच हळद आणि तेलाचा लेप लावला जातो. त्यानंतर वराला हनूमाणाच्या मंदीरात हजर केले जाते परतफेड म्हणून. विवाहात आंबा, सौंदड, पळस, उंबर, आणि रूठीच्या पानांचा गठठा मंडपाच्या एका खांबाला बांधला जातो. देवी आई व इतर देवतांच्या नावाने प्राण्यांचे बळी दिले जातात व पाहून्यांना मेजवानी दिली जाते. विवाह समारंभाचा दूसरा दिवस म्हणजे प्रत्येक्ष विवाह. या दिवशी वधू वराला एकमेकांसमोर उभे केले जाते व त्यांच्यावर तांदूळाचे दाणे शिंपडले जातात. उर्वरित 3 दिवस मेजवानी आणि आनंदउत्सव साजरे करतात. विधवांना पूर्नविवाह करण्याची अनूमती आहे परंतू ती घटस्फोटीट जातीच्या नावानेच ओळखली जाते.

     गोंधळयांच्या मूख्य देवता तूळजापूरची भवानी आणि माहूरच्या रेणूका आहेत ज्यांच्या सन्मानार्थ ते अश्विन महिन्यात सप्टेंबर/ ऑक्टोबर नवरात्र उत्सव साजरे करतात. अश्विनच्या 10 व्या दिवशी अग्नी पेटवला जातो व त्यात बोकडाचा बळी देवून दारू अर्पन केली जाते. चैताच्या महिन्यातही उपवास केले जातात. आषाढाच्या महिन्यात जून/जूलै मरीआई, कोच्चम्मा, सितळादेवी, आणि इतर देवी व देवतांची पूजाअर्चा केली जाते याही वेळी बोकडांचे बळी दिले जातात. याशिवाय इतरही वेळी जातीतील वरिष्ठ लोक पूजा करतात व सर्व हिंदू सन साजरे करतात. ब्राम्हणांना समारोहप्रसंगी व इतर धार्मीक कार्याप्रसंगी निमंत्रित केले जाते.

     मृत शरिरांना एक तर पूरले जाते किंवा जाळले जाते. यावेळी डोके दक्षिण दिशेकडे ठेवले जाते, दहाव्या दिवशी श्राध्द घातले जाते. भाद्रपद महिन्यात ऑगस्ट सप्टेंबर पूर्वजांना पाण्याची भांडी दिली जातात. पूर्वजांच्या प्राणांना खास करून महिला पूर्वजांच्या प्राणांना फूलांचे व फळांचे अर्पण केले जाते.

     बाळाच्या जन्मानंतर 10 दिवस आईला अशूध्द समजले जाते आणि या काळात तिला पलंगावर झोपू दिले जात नाही कारण असे सांगितले जाते की, त्यांची देवी रेणूका माहूरात पलंगावर झोपलेली असते. बाळाच्या जन्माच्या 5 व्या दिवशी देवी सटवाईची पूजा अर्चा केली जाते.या दिवशी बाळाचे पालक उपवास करतात. पौगंड अवस्थेतील मूलगी 3 दिवस अशूध्द समजली जाते. सामाजिक दृष्टया गोंधळयांचा दर्जा हा मराठा कूणब्यांच्या खालचा समजला जातो. ते हरिण पाळीव प्राणी व पक्षी  आणि माशांचे मांस खातात. ते मद्य प्राशन करतात. ते इतर जातींच्या प्राण्यांचे मांस खात नाहीत.

     गोंधळी व्यावसायिक भिक्षुक आहेत. ते ढोल ,संबळ, तुणतुण्याच्या तालावर नाचतात व गातात आणि देवी भवानी व रेणूका या देवींच्या सन्मानार्थ दारोदार व गावोगाव विनम्र भिक्षा मागतात. परंतू ते प्रामूख्याने गोंधळात व्यस्त असतात जे ब्राम्हण, मराठा आणि इतर जातींमध्ये साजरे केले जातात. या प्रसंगी पाच गोंधळयांचा समूह देवीची, शिवाची व खंडोबाची आराधना संगीतातून व नृत्यातून करतात. या प्रसंगी रामायण महाभारतातील पारंपारिक कथा ऐकवल्या जातात. कपाळावर हळदी कूकवाचा लेप लावला जातो. आरती पूष्प, धूप ,कापूर, आगरबत्ती पेटवीले जातात. या ठिकाणी रसेल यांनी पून्हा एकदा पूजा कशी मांडली जाते हे सांगीतले आहे. गोंधळ हा विनोदी असतो असेही लिहीले आहे. गोंधळ रात्रभर चालतो व सकाळी पूजा आरती होवून आशिर्वाद मिळवून गोंधळ समाप्त होतो. शेवटी रसेल असेही लिहीतात की, आता गोंधळ कमी होवून काही गोंधळी शेतीकडे वळले आहेत.

     मित्रांनो,  द ट्राईब्स ॲण्ड  कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया हे पूस्तक एका इंग्रजी साहित्यकाने आपल्या निरिक्षणातून व सर्वेक्षणातून लिहीले असल्याने व ते त्याच्या भाषेत म्हणजे इंग्रजी मध्ये लिहीले असल्याने मांडणीमध्ये काही चूका असू शकतात. काही चूका माझ्याकडून भाषांतरात झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही परंतू त्या होणार नाहीत याची मी पूरेपूर काळजी घेतलेली आहे. रसेल यांनी लिहीलेले वर्णन त्या काळचे म्हणजे 100 वर्षांपेक्षाही पूर्वीचे आहे. ते म्हणतात ते, म्हणजेच ते लिहीतात ते सत्य असेलच असे नाही. परंतू एका प्रसिध्द साहितीकाने व एवढया मोठया अधिका-याने आपल्या गोंधळी जाती विषयी एका फार मोठया पुरातन व प्रसिध्द पूस्तकात लिहिले आहे, जे पूस्तक जागतिक दर्जाचे आहे व जे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आभ्यासकांचे संदर्भ पुस्तक आहे! त्यात आपल्याविषयी काय लिहीले आहे हे सर्व समाज बांधवांना माहीत व्हावे यासाठी ते स्वभाषेमध्ये भाषांतरित करणे अत्यंत आवश्यक होते म्हणून मी हा भाषांतराचा खटाटोप केला.

मित्रांनो या पुस्तकातील या उता-यातील आपल्याशी संबंधित काही वर्णन आपल्याला खटकले असेल, अतिशोक्ती वाटले असेल, चूकीचे व खोटे वाटले असेल, त्यामूळे कदाचित तुमचे मन दूखावले असेल तर तो माझा दोष नाही. तसेच काही आवडले असेल तर त्याचेही श्रेय माझे नाही. मी केवळ भाषांतर केले आहे.

मात्र मी एवढी विनंती नक्की करेल की, काळाच्या प्रवाहात इतिहासातील अनेक संदर्भ बदलत असतात. तसेच संशोधक, साहित्यिक, यांच्या कडूनही छोटया- मोठया चूका होवू शकतात. कधी कधी यथोचित शब्द सुचत नाही व अर्थ बदलतो. असेही असू शकते की, एखादा साहित्यिक जाणिवपूर्वक काहीतरी काल्पनिक लिहून प्रसिध्दी मिळवू शकतो. परंतू स्वर्गीय आर. व्ही. रसेल यांची ख्याती तशी नाही. ते एक अत्यंत अभ्यासू , कष्टाळू, बूध्दीमान व वस्तुनिष्ठ साहित्यिक म्हणून जगदविख्यात आहेत. त्यांनी आपल्या विषयी काहितरी लिहीले यातच आपण मोठेपण मानायला हवे व त्यांनी काय लिहीले आहे हे वाचायला व समजून घ्यायला हवे.




बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो.9421863725.

Sunday 18 November 2018

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत...

गावाकडील तमाशामधील डान्स म्हणुन अश्लील डान्सचे व्हिडिओज अलिकडे सोशल माध्यांवरून पसरवले जात आहेत व आवडीने पाहीलेही जात आहेत. सोशल मिडीया त्याची त्याची कमाई करून जातो मात्र स्त्री जातीच्या, लोककलेच्या आणि संस्कृतीच्या अब्रुची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जातात. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर काही बुद्धीवादी या सर्वाचे लंगडे समर्थन करून फुकटचा भाव खाण्याचा प्रयत्न करतात!! पोटापाण्यासाठी करावं लागतं! त्यात काय वाईट आहे? कला आहे! पारंपरिक आहे असे म्हणुन अकलेचे दिवे पाजळतात.

अरे नालायक तत्वज्ञांनो तुम्हाला यांच्याच पोटाची बरी फिकीर आहे. दयावानांच्या अवलादिंनो कधी ख-याखु-या उपासमारांची मदत केल्याचे आठवतेय का? एखाद्या डोईवरील पदर ढळू न देता डान्स करणाऱ्या मुरळीला नाहीत सोडत असे पैसे? शांत सोज्वळ शुद्ध पुरातन धार्मिक कसे आवडेल?? मुळात कुठलीतरी भंगार कला महाराष्ट्राची म्हणून दाखवून, बाहेरच्या पोरी महाराष्ट्रीय संगीतावर नाचवून इथल्या तमाशाला व एकंदरीतच लोककला संस्कृतीला बदनाम नका करू. आपल्याकडे रस्त्यांवर कला सादर होत नाही असे नाही, मी ही त्याच जमातींमधुन आहे परंतु आपल्याकडील रस्त्यावरची कला एकतर जवळजवळ संपुष्टात आली आहे. शिवाय दुसरे म्हणजे आपली लोककला ही शुद्ध, स्वच्छ व सात्विक आहे. तिला धार्मिक अधिष्ठान आहे. अशा वासनिकतेला कला म्हणता येणार नाही. मग ते खरोखरच महाराष्ट्रात होत असेल तरीही! शिवाय प्रत्येक गोष्टीची जागा, काळ वेळ ठरलेली असतेय. त्याप्रमाणेच त्या त्या गोष्टी गोड वाटतात.

तसे तर आता आपलाही बिहार, झारखंड, हरियाणा होऊ लागलाच आहे म्हणा. आपल्याही काही तमाशा, जागरण गोंधळ, परण्या, वराती यामधील डान्स प्रकार अगदी भोजपुरी व कॅब्रेलाही लाजवेल एवढ्या खालच्या पातळीला पोहचलाय. काही ठिकाणी तर मुली म्हणुन भलतेच कंबर हलवतात!! याला कारण आहे प्रेक्षकांनी सोडलेली लाज! कलाकारांना तेच सादर करावं लागतं जे प्रेक्षकांना आवडतं!! परंतु चार पैसे मिळतात म्हणून काहीही नाही केले पाहिजे. माणसाने मेले तरी चालावे परंतु अस्मिता, स्वाभिमान व मन जीवंत राहायला हवे. कला ही निष्कलंक, सोज्वळ, चारित्र्यसंपन्न, प्रबोधक व निखळ मनोरंजक असायला हवी. पुर्वी ती तशीच होती अगदी बेडाग व सन्माननीय! परंतु आता हवा बदलतेय. हे बंद झाले पाहिजे. बंद केले पाहिजे.

बरे उपदेश तरी त्यांना कसा करावा?? परंतु मला दुःख ही होते व किव येते त्या पोरींची!! जणाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. वखवखलेल्या नजरांमध्ये विभत्स्य अंगविक्षेप ज्याला नृत्य म्हटले जातेय ते करून भिक मागणे भूषणावह वाटते काय? अशाप्रकारे खुल्लमखुल्ला देहप्रदर्शन करण्याशिवाय इतर कुठलाच मार्ग सापडत नाही का यांना उदरनिर्वाहासाठी?? स्वतः कष्ट करायला नकोत, शिकायला नको, बदलायला नको आणि पुन्हा समाजाला आणि सरकारला दुषने द्यायला बुद्धीवादी व मिडीया तयार. पारंपरिक आहे म्हणून सर्वच जपले पाहीजे का?? माझा याला स्पष्ट विरोध आहे.

मुळात कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळवायची मानसिकताच धोकादायक आहे. मला असे अजिबात नाही म्हणायचे की या मुली स्वेच्छेने आनंदाने हे काम करत आहेत. मला असेही नाही म्हणायचे की त्या अगदी फावड्यानेच पैसे ओढत आहेत म्हणून, त्यांची मजबुरी त्यांचे कमी शिक्षण, त्यांच्यावरील कौटुंबिक संस्कार व त्यांच्या सभोवतालची परिस्थिती असेल कदाचित जी समजून घेतली जाऊ शकते. शिवाय या मुली "त्या मुली" ज्या मुली नसतातच मुळी!! त्या उदर्निवाहाचे नाव पुढे करून जर असे चाळे करत असतील तर मी तरी ते मान्य करू शकत नाही. यांना ना बुद्धी कमी आहे ना यांची शारिरीक क्षमता कमी आहे उलट यांच्यामध्ये अंगभूत कलागुण व सृजनशीलता ठासून भरली आहे. परंतु असे असले तरी हे लोक दिशा भरकटले आहेत, यांचा रस्ताच चुकलेला आहे. चूकीच्या रस्त्यावर चालत असताना ध्येय प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणूनच याचे समर्थन नाही होऊ शकत.

अहो ठरविल्यावर काय अशक्य आहे हो? कोण म्हणतोय अगदी कलेक्टरच बना पण निदान शिपाई, लिपिक तरी बना, राहीले डॉक्टर निदान नर्स तरी बना, राहीले इंजिनिअर निदान यांत्रिक तांत्रिक कामगार तरी बना. ज्यांनी जग बदलून दाखविले आहे आजवर ते काही सोन्याच्या चमचाने अम्रुत पिऊन नव्हते ना आले!! नाहीच जमले तर मजुरी करा परंतु इज्जत घालु नका. म्हणून योग्य आयोग तपासून चुकीचे सोडून देण्यातच खरे शहाणपण आहे. हे असे धंदे आयुष्यभर करता येत नाहीत. समर्थन करणारे आपल्या मुली बहीणींना का नाही स्ट्रीट डान्सर्स बनवत? आवडेल? मला तर नाही आवडणार? इज्जतीने पोट भरणे, नाव कमावणे खुप सोपे नक्कीच नाही परंतु खुप कठीणही नक्कीच नाही. फक्त परिश्रम करण्याची तयारी व सकारात्मक इच्छाशक्ती हवी.

अरे आता तारूण्यावर दोन पैसे उधळणारे कुबेर नंतर वृद्धापकाळात दमडी देणे तर सोडा डुंकूनही बघत नाहीत. असा आजवरचा इतिहास आहे. संस्कृती संवर्धन, संस्कृती रक्षण असे वजनदार शब्द वापरून परिस्थिती बदलत नाही. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. आपण जर आपल्यात बदल नाही घडवून आणला तर आपण राहु येथेच जिथे आहोत तिथे अर्थात रस्त्यावर!! आणि जग जाईल चंद्रावर. आपण पहातच काय अनुभवतही आहोतच की? लोक कलावंतांचे, कलावंत जमातींचे आयुष्य संपले परंतु दारिद्रय, सामाजिक अप्रतिष्ठा नाही संपली. जे शिकले ते संपन्न व सन्मानित झाले परंतु शिक्षण जे या समृद्धतेचे व संपन्नतेचे गमक आहे ते मात्र अगदी गोपनीय ठेवले. त्यामुळे मला वाटते सर्वच नाही पण किमान अप्रतिष्ठीत, कमी मोबदल्याच्या आणि चारित्र्यहनन करणाऱ्या पारंपरिक लोककला रस्त्यावर सादर करू नयेत.

हे शोषण तर आहेच पण ही एकप्रकारची मानसिक गुलामगिरीदेखील आहे. यात पिढ्याच्यापिढ्या बरबाद झाल्या. त्यापेक्षा उदरनिर्वाहाचे, रोजगाराचे इतर पर्याय शोधले पाहीजेत. शोधले म्हणजे सापडतेच. शिकून सवरून एक तर प्रशासनात या, खाजगी कंपन्यात जा किंवा मग आपल्यातील जन्मजात कलागुणांना शिक्षण, तंत्रज्ञान यांची जोड देऊन मानसन्मान, पैसा व प्रतिष्ठा कमवा. आदर्श घ्यायला खुप आहेत. फार लांब जाण्यापेक्षा नागराज मंजुळे, अजय-अतुल यांच्याकडे पहा. तेही जर असेच रस्त्यावर कला सादर करत बसले असते तर??? चुक भुल माफ करा.

बाळासाहेब सिताराम धुमाळ.
9673945092.