Friday 22 April 2016

जागतिक वसुंधरा दिन

मित्रांनो आज जागतिक वसुंधरा दिन  (World Earth Day)🌎

एकेकाळी अत्यंत सुंदर, जणूकाही स्वर्ग शोभावी, अशी पृथ्वी आज जीवन जगण्यासाठी प्रतिकूल बनत चालली आहे. तिची ही अवस्था आपणच केली आहे.
भुकंप, ज्वालामुखी, त्सुनामी , हिमवृष्टी, अतिवृष्टी व महापुर, जलसंकट, दुष्काळ, वादळे, उष्मावृद्धी, नवनविन विषाणूजन्य असाध्य आजार हे तीच्या आजच्या अवस्थेचे परिणाम! !!
मित्रांनो ही पृथ्वी आपल्याला आपल्या पुढच्यांनी दिली आहे, आपण आपल्या मागच्यांना काय देणार? ???
आपले वंश जगावेत व पृथ्वीवर मानव सृष्टी व जीवसृष्टी टिकावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी हे केलेच पाहिजे. ....👇�
🌎पाणी वाचवून जलप्रदूषण टाळणे.
अन्नाची नासाडी टाळणे.
🌎वैयक्तिक वाहणांचा कमितकमी वापर करणे.
प्लॅस्टिक, थरमाकाॅल इ. चा वापर टाळणे.
🌎प्लॅस्टिक, फायबर, टायर यांचा पुनःर्वापर करणे त्यासाठी या वस्तू भंगारात विकणे.
🌎ध्वनी प्रदुषण (व्हईकल फायरींगज, व्हाॅर्नस, डीजे, फटाके इ.) टाळणे.
🌎वृक्षतोड थांबवणे, वृक्षारोपण करून ती जगवणे.
🌎कमीतकमी पाण्याची पिके घेणे.
जल पुनर्भरण करणे, पाणी आडवूण जिरवणे.
🌎भुजलाचा वापर शक्यतो टाळणे.
जैवविविधता टिकविणे. (पशु, पक्षी, वनस्पती)
🌎🌎
आणि सर्वात महत्वाचे "स्वतःपुरते न जगता, भविष्यात ज्यांना जगायचे आहे त्या आपल्या वंशजांचा विचार करून जगणे"
विचार करू नका. ..
कारण आता तेवढाही वेळ नाहीये. आपण आपल्या वर्तनात व शासनांनी त्यांच्या धोरणात तात्काळ बदल नाही केला तर पुढील शंभर वर्षांत आपल्या पृथ्वीच्या बहूतांश भागावर जीवन नसेल! !!!!

पृथ्वी दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐
"जगा आणि जगवा,  जीवसृष्टी टिकवा"

............बालासाहेब धुमाळ🙏

Wednesday 20 April 2016

विचारांचा लढा का मुस्कटदाबी

विचारांचा लढा का मुस्कटदाबी????

पुरोगामी महाराष्ट्रात आणखी किती बळी घेणार आहेत सनातनी? ????
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कुठपर्यंत? ? आवाज दाबता नाही आला की कायमचाच आवाज बंद करणार? ?
वारे वा धर्म रक्षक! !! वारे वा हितचिंतक! !!
पुरोगामी राज्यात पुन्हा एक धमकी.....

"चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको"  कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला विरोध करु नका, अन्यथा तीन गोळ्यांनी ज्याप्रकारे अचूक वेध घेतला, तसं चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे.

तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या हितचिंतकाच्या पत्रात करण्यात आला आहे.

महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही.

एक हितचिंतक......

व्वा रे हितचिंतक! !!!
अहो, विचारांची लढाई विचारांनी लढायची असते.  मतांबाबत भिन्नता असते आणि असावीही, मात्र त्यात लवचिकताही असावी, प्रथा अयोग्य व तर्कविसंगत  असेल तर बदल करून घेण्याची मानसिकता असायला हवी. माझे ते खरे म्हणण्याऐवजी खरे ते माझे म्हणण्याची आपली रित आहे. .. बालासाहेब धुमाळ

Tuesday 12 April 2016

चौथरा

चौथरा

बरं झालं बायांनो
तुम्ही  चौथरा चढलात.
वर्षानुवर्षाचा अनिष्ट
पायंडा तुम्ही मोडलात.

तुम्ही कितीही योग्यता
सिध्द जरी केलीत.
पुरुषी अहंकाराने     
मने आमची मेलीत.

विरोध तरी पुरुष 
करत आहेत कुणांना ?
हाडामासाने बनलेल्या
आपल्याच आया बहीणींना.

स्त्रीला इथे शक्तीचे 
नाव तेवढे देतात.
पण मंदिरात जाणारीला
आडवायला ही येतात.

कायदा परंपरा मानत नाही
घटनेचे येथे राज्य आहे.
देव काही बोलत नाही पण
म्हणे त्याला स्त्री त्याज्य आहे.

देव तो देवच
तो चराचरात आहे.
सांगितले फक्त एवढेच जाते
तो पती नावाच्या नरात आहे.

लेकरे सारी त्याचीच आहेत 
तो कसा काय भेद करेल?
चुकतेय कुठेतरी आपले 
पुरूष कधी खेद करेल? 

हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी
हे म्हणायला कोणीच मागे हटत नाही.
अन वास्तवात मात्र अनेकींना
पाळणाच भेटत नाही.
 
कर्तव्याला देव मानुन 
कर्म जो करतो.
खरा भक्त तोच त्याच्या
घरी देव पाणी भरतो.

मी तर तुम्हाला सांगेल
दगडात कुठे देव असतो का ?
असताच जर का तो तिथे
तर मी सर्वसुखी झालो नसतो का ?

मदतीला एखादया अबलेच्या 
धावून तुम्ही जाताल.
तर आनंदी तिच्या चेह-यावर 
देव तुम्ही पाहताल.

 शब्दांकन : 
     बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ 
     मो. 9421863725

Sunday 10 April 2016

संभाजी महाराज आणि गुढीपाडवा

संभाजी महाराज आणि गुढीपाडवा
मित्रांनो नमस्कार 🙏
सुप्रभात 💐💐💐
आजची सकाळ खास आहे.
आज चैत्र शुद्ध 1 शके 1938 अर्थात शक दिनदर्शिकेतील 1938 व्या वर्षातील पहीला दिवस! !!
मित्रांनो यात तिळमात्र शंका नाही की गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो आहे आणि यातही शंका नाही की शंभू राजांच्या बलिदानापुर्वीपासूनच हा सण अस्तित्वात आहे. हा हिंदू नव वर्षाचा पहीला दिवस, त्यामुळे नुतन वर्षारंभ दिन साजरा करायलाच हवा. पण हेही लक्षात घ्यायला हवे की एखाद्या सणाचे दिवशी आपल्या घरात एखादी दुखद घडली तर आपण तो सण साजरा करत नाही अथवा अगदी साधेपणाने साजरा करतो.
हिंदू धर्मच राहीला नसता तर आजचे धर्माभिमानीही राहीले नसते. मग ते ब्राह्मण असोत, संभाजी ब्रिगेड वाले असोत वा हिंदू धर्माचा अभिमान असणारे तुमच्या माझ्या सारखे सामान्य नागरिक असोत. बरे ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिले त्यांच्या प्रती आपण एवढे कृतघ्न असावे का ? ?
ज्यांनी राजांना पकडून देण्यात मदत केली, त्यांना आपण पाठीशी घालावे का??? का म्हणून आपण आपली संस्कृती विसरावी ??? तर मला वाटते नाही.  म्हणून मी यावर एक तोडगा 5-6 वर्षांपुर्वीच काढला आहे, गूढी ही आनंदाचे व विजयाचे प्रतीक आहे म्हणून मी वैयक्तिक माझ्या घरी, (लग्नानंतरचे घर) गूढी उभारत नाही पण नव्या वर्षाचे स्वागत माझ्या पद्धतीने करतो.
आंघोळ स्नान, औक्षण ,देवपूजा व दर्शन घेऊन  मागील वर्षी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागुन नविन वर्षासाठी देवाकडे आशिर्वाद मागतो, संकल्प करतो. यामुळे मला वाटते की मी माझी संस्कृतीही जोपासत आहे व शंभूराजेंविषयी कृतज्ञताही बाळगत आहे. त्यासाठी मी कोणावरही जबरदस्ती करत नाही. अगदी माझ्या आई - वडीलांवरही नाही.
मित्रांनो शके 1937 आपणास आनंदाचे गेले असेलच, नसेल गेले तर मागील वर्षी आलेले नकोसे अनुभव यापुढे कधीही न येवोत हीच जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मागील वर्षी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी विनम्रपणे माफी मागतो आणि नव्या वर्षाच्या सर्वांना मनापासुन शुभेच्छा देतो.
आई जगदंबा आणि माळसाकांत खंडेराया आपणास नविन वर्षात अपार आनंद,  सुख, समाधान, शांतता,  प्रतिष्ठा, यश, समृद्धी व आरोग्य देवो हीच प्रार्थना.
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला : बालासाहेब सिताराम  (बी. एस.)धुमाळ , बीड .

Friday 1 April 2016

बाप by Balasaheb Sitar am Dhumal

...................................... बाप ......................................

मित्रांनो आपण पहातो की, लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, झाडावर चढू नको, नदीकडे जाऊ नको, शाळेत जा,  अभ्यास कर नाहीतर बाप मारील. 
मग मुलं सुद्धा बापाला घाबरून बापाच्या भयाने शाळेत जातात,  अभ्यास करतात, बापाच्या दहशतीखाली शिकत राहतात, मोठी होतात. हळू हळू मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन आई वरच प्रेम करु लागतात. बापापासून दुरावतात आणि
आणि आईकडे आकर्षित होतात.आईचं गाणं गातात, तिच्यावर कविता लिहितात. कोणतंच मुल बापाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. बापासाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात. पायाला ठेच लागली की "आई गं" म्हणतात  पण "बापरे" म्हणत नाहीत.स्वामी तिन्ही जगाचा "बापाविना" भिकारी होत नाही. साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही. आई घरात असली कि, घर कसं भरल्यासारखं वाटतं. पण बाप घरात असला की, मात्र स्मशान शांतता.मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.बाप शप्पथेच्याही लायकीचा नसतो.बाप असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येच.
मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.धरणीला 'माय' म्हणतात आणि देशाला 'माता' म्हणतात.  मात्र धरणीत, देशात मुलांना बाप कधीच दिसत नाही.  कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा व्यक्ती म्हणजे बाप . केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र! तेच त्याचे काम, ते त्याने केलं की, त्याचं महत्व संपलं.
पण मग एवढं सगळं असूनही तोच बाप मेल्यावर छातीत धडकी का भरते ?का ओघळतो डोळ्यातून पाऊस! का पायाखालची जमीन सरकते. का वाटतं बेवारस झाल्या सारखं.
का हंबरतात अन घाबरतात बाप मेल्यावर?कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाप खरचं पत्थरदिल असतो का हो? मग का हा अन्याय त्याच्यावर? 
मित्रांनो, डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई" म्हणतात. पण...  डोळ्यात प्रेम न दाखवता जो स्वतः संपेपर्यंत लेकरांवर प्रेम करतो, त्याला  "बाप" म्हणतात मित्रांनो.
मुलाचं करियर तो करतो,  त्याला राणी तोच शोधतो. मुलीला चांगल्यात चांगले सासर तोच शोधतो. आहे नाही तेवढं लेकरांवर उडवून, वेळ आलीच मुलांकडून घराबाहेर हाकलले जाण्याची तर बायको अगोदर तोच घराबाहेर पडतो.
मित्रांनो एवढा अन्याय अत्याचार सहन करूनही, दुर्लक्षित राहूनही बाप मात्र आपली सर्व कर्तव्ये पुर्ण करतो. व्यक्तीची ओळखंच मुळात बापापासून होते. धर्म, जात, नाव, वारसा, हक्क-अधिकार , नाती व प्रतिष्ठा बापापासूनच मिळतात. पुर्वी काही पदे देखील बापापासूनच मिळत.
त्याचे प्रेम दिसत नाही पण वर म्हटल्याप्रमाणे तो आजिवन आपल्या लेकरांच्या भवित्यासाठीच झगडत असतो. कारण तो लेकरात, त्यांच्या भवितव्यात स्वतःहाला पहात असतो. मृत्यू नंतरही लेकरांत जिवंत रहात असतो.


शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ 
मो. 9421863725.