Friday 22 April 2016

जागतिक वसुंधरा दिन

मित्रांनो आज जागतिक वसुंधरा दिन  (World Earth Day)🌎

एकेकाळी अत्यंत सुंदर, जणूकाही स्वर्ग शोभावी, अशी पृथ्वी आज जीवन जगण्यासाठी प्रतिकूल बनत चालली आहे. तिची ही अवस्था आपणच केली आहे.
भुकंप, ज्वालामुखी, त्सुनामी , हिमवृष्टी, अतिवृष्टी व महापुर, जलसंकट, दुष्काळ, वादळे, उष्मावृद्धी, नवनविन विषाणूजन्य असाध्य आजार हे तीच्या आजच्या अवस्थेचे परिणाम! !!
मित्रांनो ही पृथ्वी आपल्याला आपल्या पुढच्यांनी दिली आहे, आपण आपल्या मागच्यांना काय देणार? ???
आपले वंश जगावेत व पृथ्वीवर मानव सृष्टी व जीवसृष्टी टिकावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी हे केलेच पाहिजे. ....👇�
🌎पाणी वाचवून जलप्रदूषण टाळणे.
अन्नाची नासाडी टाळणे.
🌎वैयक्तिक वाहणांचा कमितकमी वापर करणे.
प्लॅस्टिक, थरमाकाॅल इ. चा वापर टाळणे.
🌎प्लॅस्टिक, फायबर, टायर यांचा पुनःर्वापर करणे त्यासाठी या वस्तू भंगारात विकणे.
🌎ध्वनी प्रदुषण (व्हईकल फायरींगज, व्हाॅर्नस, डीजे, फटाके इ.) टाळणे.
🌎वृक्षतोड थांबवणे, वृक्षारोपण करून ती जगवणे.
🌎कमीतकमी पाण्याची पिके घेणे.
जल पुनर्भरण करणे, पाणी आडवूण जिरवणे.
🌎भुजलाचा वापर शक्यतो टाळणे.
जैवविविधता टिकविणे. (पशु, पक्षी, वनस्पती)
🌎🌎
आणि सर्वात महत्वाचे "स्वतःपुरते न जगता, भविष्यात ज्यांना जगायचे आहे त्या आपल्या वंशजांचा विचार करून जगणे"
विचार करू नका. ..
कारण आता तेवढाही वेळ नाहीये. आपण आपल्या वर्तनात व शासनांनी त्यांच्या धोरणात तात्काळ बदल नाही केला तर पुढील शंभर वर्षांत आपल्या पृथ्वीच्या बहूतांश भागावर जीवन नसेल! !!!!

पृथ्वी दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐
"जगा आणि जगवा,  जीवसृष्टी टिकवा"

............बालासाहेब धुमाळ🙏

No comments: