Thursday 9 June 2016

विरह

विरह....

पती-पत्नीचे नाते अत्यंत विलक्षण व जगावेगळे. ...
दोन वेगवेगळ्या घरात व कुळात जन्माला आलेले दोन जीव लग्नानंतर मात्र एकात्म होतात! !!
त्यातही स्त्रीचे जीवन म्हणजे एक तपश्‍चर्याच म्हणावी लागेल! ! स्वतंत्र नावाने वेगळ्या घरी वेगळ्या वातावरणात आयुष्याची साधारणपणे 18-25 वर्षे घालवलेली मुलगी लग्नानंतर मात्र स्वतःमध्ये एवढे बदल करून घेते की ती त्या पुरूषाची अर्धांगिनी कधी बनते? त्या कुटूंबरूपी गाडीचे दुसरे चाक कधी होते? हे लक्षातही येत नाही. ती सासरशी व पतीशी एवढी समरस होते, तेही हसतमुखाने मनापासून !! ती त्या कुटूंबामध्ये एवढी गुंतून घेते, की ती स्वतःलाही विसरून जाते. नाव बदलते आवडीनिवडी बदलते व पतीसाठी, कुटूंबासाठी स्वतःला अगदी पुर्णपणे वाहून घेते. जगाच्या पाठीवर हे चित्र केवळ भारतातच पहावयास मिळते. . .
जन्म एका घरात अन मृत्यू दुसर्‍या घरात! !!  विलक्षण आणि अदभुतच आहे ना? ??  तीची घराला अशी काही सवय लागते, की ती म्हणजेच घर व घर म्हणजेच ती!! ती जर घरात नसेल तर घर, घर रहात नाही. . आणि मग पतीची पत्नी विरहाने होणारी अवस्था? ?? भुक लागते पण घास गळ्याखाली उतरत नाही! झोप असते डोळ्यात पण पापण्या परस्परांना खेटत नाहीत!  डोके असते पण चालत नाही! मन असते पण लागत नाही !!! मन भुतकाळातील आठवणीत व डोळे वाटेकडे गुंतलेले असतात. विरहाच्या  वेदना मी व्यक्त करण्याऐवजी संदिप खरेंनी कशा व्यक्त केल्या आहेत पहा ना. ..

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा
श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय ,मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो
.......

आई नंतर स्त्रीच्या पत्नी रूपाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ....

शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

No comments: