Monday 15 October 2018

भटके विमुक्त हक्क परिषद म.रा. दादर चिंतन बैठक

प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय विचारमंथन बैठक दादर येथे  संपन्न
-------------------------------------------------------------------------

(दादर, मुंबई)
दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी यादव गवळी ट्रस्टच्या नायगाव, दादर, मुंबई येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत "भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य" या भटक्या-विमुक्तांच्या संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची व राज्यभरातील विविध संघटनांच्या पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्त्यांची विचारमंथन बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षपद संघटनेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी भूषविले तर बैठकीला संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे, सचिव प्रा.श्री. सखाराम धुमाळ, उपाध्यक्ष श्री. मंगेश सोळुंके, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख श्रीमती प्रियांका राठोड, शिक्षक आघाडीचे राज्य प्रमुख श्री. कृष्णा जाधव, नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष  वसंत गुंजाळ,  साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर , बी टी मोरे  युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतीक गोसावी आदी पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस राज्यभरातुन साधारणपणे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीची सुरुवात संघटनेचे सचिव प्रा. श्री. सखाराम धुमाळ यांच्या स्फूर्तीगीताने झाली. प्रास्ताविक प्रा सखाराम धुमाळ यांनी केले व हक्क परिषदेच्या सुरुवातीपासूनचा आजपर्यंतचा प्रवास या बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शिक्षक आघाडी राज्य प्रमुख श्री कृष्णा जाधव यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेची उद्धिष्ट , ध्येय, धोरण या बाबत माहिती देऊन पुढील वाटचाल या ध्येय धोरणाला धरूनच असणार असल्याचे  सांगण्यात आले. प्रदेश कोषाध्यक्ष तथा  नाशिक विभाग अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे यांनी  संघटनेची कार्यपद्धती कशी राहील या बाबत माहिती दिली व संघटनेची आचारसंहिता या बाबत माहिती देऊन ती प्रत्येकाने पाळावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.  तसेच नाशिक विभागातील धुळे,नंदुरबार, जळगांव, नगर , नाशिक येथे झालेल्या आंदोलनाचा अनुभव सांगितला व नाशिक विभागातून सुरू झालेले हे लक्षवेधी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्यासाठी सर्वानी प्रयन्तशील राहावे असे श्री काळे म्हणाले व सर्वानुमते आचारसंहिता मान्य करण्यात आली असून आचारसंहितेचा भंग भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे सर्वानुमते मान्य करण्यात आले . संघटनेची प्रदेश , विभाग, जिल्हा , तालुका अशी रचना असून त्यात समाविष्ट पदांची रचना मांडण्यात आली शिवाय हक्क परिषदेत महिला आघाडी, शिक्षक आघाडी, युवा आघाडी , वकील परिषद अश्या विविध आघाड्यांची रचना देखील कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यभर करावयाच्या आक्रोश आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक विभाग) यशस्वी आंदोलनाचे श्रेय सर्वांनी विभागीय अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, श्री. साहेबराव गोसावी श्री. वसंत गुंजाळ, श्री. सुपडू खेडकर , श्री. अशोक महाराज पुरी या सह नाशिक विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांना दिले. सर्वांनी त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.

आंदोलनाचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र ( पुणे विभाग) येथून नवरात्रोत्सवानंतर प्रारंभ करण्याचे ठरले. या टप्प्याची सुरुवात कोल्हापूरपासून करून सांगली, सातारा करीत पुणे येथे भव्य समारोपीय आंदोलन करण्याचे निश्चित झाले. दरम्यान महिला आघाडीच्या वतीने रत्नागिरी येथे  महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा डॉ प्रियंका राठोड  मा बी टी मोरे एक भव्य लक्षवेधी एक दिवसीय आक्रोश आंदोलन  देखील छेडण्याचे  ठरले.

हक्क परिषदेने  घेतलेला उत्तर महाराष्ट्रात दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे  येथे घेतलेला विभागीय मेळावा, आजवर झालेल्या  गोलमेज परिषदा, आक्रोश आंदोलने, मंत्रालयात अधिका-यांशी व मंत्र्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या बैठका यांद्वारे काय साधले? यात कितपत यश वा अपयश आले? यावर साधक बाधक चर्चा झाली. आंदोलनातील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाबींवर विचारविमर्श झाला. आगामी काळात चळवळीत महिलांचा, युवकांचा, नोकरदारांचा, कलावंतांचा तसेच तंत्रज्ञानाचा समावेश वाढविण्यावर एकमत झाले. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना भेटून, निवेदन देऊन, चर्चा करून मा.दादा इदाते आयोग लवकरात लवकर लागू करण्यासाठी विनंती करण्याचे बैठकीत निश्चित झाले.

अलीकडच्या काळातील भटक्या-विमुक्तांवरील अत्याचाराच्या घटना जसे की राईनपाडा हत्याकांड, हिंजवडी बलात्कार प्रकरण, श्रीगोंदा महीलेस विवस्त्र करून मारहाण प्रकरण तसेच वारजे भिक्षुक अटक प्रकरण या विविध प्रकरणांमध्ये हक्क परिषदेने कशाप्रकारे पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे भूमिका घेतली यावरही थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर राज्यभरातून आलेल्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली थोडक्यात मनोगते व्यक्त केली. यात समाजाचा, इतिहास, सद्यस्थितीतील समस्या, उपाय व चळवळीची दिशा यांवर मतप्रदर्शन झाले. दुपारच्या सत्रात संघटनेत पुढील काळात स्वेच्छेने जबाबदारीपूर्वक सक्रिय राहू इच्छिणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हक्क परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर, विभागीय कार्यकारणीवर तसेच जिल्हा कार्यकारिणीवर नेमण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात विविध स्तरांवर या कार्यकर्त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. लगेचच नियुक्तीपत्रे त्यांना प्रदान करण्यात आली.

नियुक्त्यांमध्ये श्री. रामचंद्र जाधव (पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष), श्री. वसंत गुंजाळ (प्रदेश संघटक), श्री. साहेबराव गोसावी (प्रदेश संघटक), श्री. सुपडू खेडकर (नाशिक विभागीय संघटक), श्री. अशोक गिरी (नाशिक विभागीय संघटक), श्री. संजय गोसावी (शिक्षक आघाडी नाशिक विभाग प्रमुख), श्री. श्याम शिंदे (प्रदेश संघटक), श्री. अमर करंजे (प्रदेश संघटक), श्री. शिवाजी भिसे (मुंबई उपनगरीय संघटक), श्री. मल्लू पवार (नाशिक विभागीय संघटक), श्री. शिवाजी गिरी (युवा जिल्हाध्यक्ष बीड), श्री. रामकृष्ण मोरे (नंदूरबार जिल्हाध्यक्ष),  श्री. दिपक वनारसे (कार्यालय प्रमुख), श्री. जयराज भाट ( प्रदेश संघटक), श्री. शिवदास वाघमोडे (नाशिक विभाग संघटक), श्री. शंकरराव कोळेकर (प्रदेश संघटक), श्री. बळीराम महाडिक (प्रदेश संघटक), श्री. गोपीचंद इंगळे(नाशिक विभागीय संघटक), श्री. बापू डुकरे (अंबरनाथ शहराध्यक्ष), श्रीमती भाग्यश्री प्रमोद (महिला संघटक),  श्री. दत्तात्रय मोरे (मुंबई कामगार संघटक), श्री. नारायण सीताराम खेडेकर (मुंबई शहर उपाध्यक्ष), श्री. हनुमंत शेगर (अंबरनाथ शहर उपाध्यक्ष), श्री. अशोक गायकर (मुंबई प्रदेश संघटक) श्री. राकेश तमाचेकर (नंदुरबार जिल्हा संघटक), श्री. साहेबराव कुमावत (प्रदेश संघटक)इत्यादी पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या व नियुक्तीपत्रे देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी सर्वांना सर्व शक्तीनिशी राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्वार्थ, मीपणा, मोठेपणा बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जे जे भटक्या विमुक्तांचे कार्य करतील, जेव्हा जेव्हा आपणास आवाज देतील तेव्हा तेव्हा राज्यातील हक्क परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. दि. 21ऑक्टोबर 2018 रोजी बोरिवली, मुंबई येथे मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय विचार मंथन बैठक होत असून हक्क परिषदेस त्या बाबतच निरोप आला आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे श्री. ओंबासे म्हणाले.

संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनात सांगीतले की कार्यकर्त्यांनी भाषणबाजीवर जास्त जोर न देता कार्यावर अधिक लक्ष द्यावे. ते म्हणाले की, मा. दादा इधाते आयोग मंजूर करून घेणे हेच आपले उद्धिष्ट असुन त्यासाठी समर्पित भावनेतून काम करण्याचा सर्वांनी निर्धार करावा. तसेच लवकरच मा. मुख्यमंत्र्यांची व मा. पंतप्रधानांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. अखेरीस प्रदेश उपाध्यक्ष श्री. मंगेश सोलंकी यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म.रा.
मो. 9673945092.

No comments: