Wednesday 11 April 2018

विजाभज संघटन

सर्व भटक्या विमुक्त भावाबहीणींनो नमस्कार🙏
आपल्या जातीय संघटना खुप आहेत. म्हणजे मी हमेशा मस्करीत म्हणत असतो," मुठभर लोकांच्या ओंजळभर संघटना"!!!!  माणसं कमी अन पदाधिकारीच जास्त झालेत. संघटना असणे, संघटीत असणे चांगलेच मात्र जास्त संघटना असणे हे असंघटित असल्याचे लक्षणच नव्हे तर पुरावा समजा....
बरे या संघटनांचा भटक्या विमुक्तांच्या चळवळीला काही उपयोगही होत नाही. अनेकांना तर भटके विमुक्तांची चळवळ काय आहे हेच माहीत नाही!!!
तेंव्हा मला वाटते, जातीय संघटनांनी आपापले अस्तित्व व अस्मिता कायम ठेवून शासकिय व राजकीय स्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. जातीय संघटना शासनदरबारी प्रश्न सोडवू शकत नाहीत. शासन कोण्याही एका जातीचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची जशी आघाडी वा युती असते त्यापध्दतीने अगोदर जातीय संघटनांची व नंतर भटक्या विमुक्तांची एकच शिखर संघटना असायला हवी.
भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आज रोजी अनेक नोंदणीकृत संघटना आहेत. आपल्या आवडीनुसार व त्यांच्या योग्यतेनुसार आपली शक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी करा. आपापल्या रिती परंपरा, भाषा, वेष, कला जोपासा पण सोबतच परस्परांतील नकारात्मक स्पर्धा, असुया, मत्सर हेवेदावे मात्र बाजूला ठेवा. श्रेयाचा विचार सोडून द्या आणि सर्वांनी सर्वांच्या भल्यासाठी एकत्र या...
आपण म्हणजे भटके विमुक्त लोकशाहीमध्ये राजकीय पर्याय बनू शकतो काय? यावरही विचार मंथन करायला हवे असे वाटते. कारण लोकशाहीचा मतदार सर्वात प्रभावी घटक आहे. लोकशाहीत प्रश्न सदनाशिवाय व शासकिय प्रशासकीय टेबलांशिवाय सुटू शकत नाहीत. आणि प्रश्न सुटू शकतात कोणाचे तर जे एकजूट असतात त्यांचे!!! त्यामुळे एकतर पक्ष स्थापन करा अथवा मजबूत व सर्वव्यापी संघटना बनवा. राजकिय पक्षांना देखील आपले महत्त्व समजावून सांगा. सर्वजण (राजकीय पक्ष व मागासवर्गीय संघटना) आपला केवळ वापर करून घेत आहेत मात्र आपल्याला देत काहीच नाहीत. लोकसंख्येत आपण २५% आहोत मात्र असंघटीत आहोत आणि त्यामुळे दुर्लक्षित आहोत म्हणून आता संघटीत व्हा व मागायचे सोडून द्यायला भाग पाडा......✊✊✊✊✊

........बाळासाहेब धुमाळ.
........मो. 9673945092

No comments: