आरक्षण व परकेपणः
आरक्षणाने काही दलित, आदिवासी, मागासवर्गीयांची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती निश्चितच सुधारली मात्र सामाजिक परिस्थिती जैसे थीच आहे.
तुम्ही कितीही सुस्वभावी, शुद्ध चारित्र्यवान, सभ्य व नम्र, सुंदर व देखणे, बुद्धिमान व कुशल वा मग श्रीमंत असा, जर तुम्ही मागास जातीतील असाल तर समाजाची पाहण्याची दृष्टी, परकेपणाची व हिनतेचीच होती व आहे.
हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अपवादही आहेत म्हणा पण ते दशांश रुपात!!!
हि जातीव्यवस्था कधी संपेल? पाहण्या वागण्या बोलण्याची पद्धती सर्वांची सर्वांशी सारखीच कधी असेल?
मानवता हाच धर्म, माणुस हिच जात आणि स्त्री आणि पुरुष या दोनच उपजाती अशी सामाजिक स्थिती कधी अस्तीत्वात येईल?
कोणी म्हणेल आरक्षण संपुष्टात आणल्यावर. कोणी म्हणेल टी.सी.वरून जातीचा रकाना हटविल्यावर! तर मला वाटते अजिबात नाही. कारण आरक्षण व टी.सी. आता काल परवा अस्तित्वात आले आहे. मात्र जातीय विषमता हजारो वर्षांपासून आहे. धर्मांतर करावे तर कोणताच धर्म कोणत्याच धर्माकडे मानवतेच्या नजरेने, आपलेपणाने पाहात नाही.
देश सोडु शकत नाही आणि समजा सोडला तरी तेथेही निर्वासित म्हणुन कमी लेखले जाईल, त्रास दिला जाईल. आता राहीला पर्याय प्राणत्यागाचा तर त्याने काही फरक पडला का? हे मेल्यावर कसे कळणार? आणि असेही नाही की आजवर अपमानित होऊन कोणी आत्महत्या केलेली नाही!!
त्यामुळे पर्याय काय असेल मला कळत नाही....😓
बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.
आरक्षणाने काही दलित, आदिवासी, मागासवर्गीयांची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती निश्चितच सुधारली मात्र सामाजिक परिस्थिती जैसे थीच आहे.
तुम्ही कितीही सुस्वभावी, शुद्ध चारित्र्यवान, सभ्य व नम्र, सुंदर व देखणे, बुद्धिमान व कुशल वा मग श्रीमंत असा, जर तुम्ही मागास जातीतील असाल तर समाजाची पाहण्याची दृष्टी, परकेपणाची व हिनतेचीच होती व आहे.
हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अपवादही आहेत म्हणा पण ते दशांश रुपात!!!
हि जातीव्यवस्था कधी संपेल? पाहण्या वागण्या बोलण्याची पद्धती सर्वांची सर्वांशी सारखीच कधी असेल?
मानवता हाच धर्म, माणुस हिच जात आणि स्त्री आणि पुरुष या दोनच उपजाती अशी सामाजिक स्थिती कधी अस्तीत्वात येईल?
कोणी म्हणेल आरक्षण संपुष्टात आणल्यावर. कोणी म्हणेल टी.सी.वरून जातीचा रकाना हटविल्यावर! तर मला वाटते अजिबात नाही. कारण आरक्षण व टी.सी. आता काल परवा अस्तित्वात आले आहे. मात्र जातीय विषमता हजारो वर्षांपासून आहे. धर्मांतर करावे तर कोणताच धर्म कोणत्याच धर्माकडे मानवतेच्या नजरेने, आपलेपणाने पाहात नाही.
देश सोडु शकत नाही आणि समजा सोडला तरी तेथेही निर्वासित म्हणुन कमी लेखले जाईल, त्रास दिला जाईल. आता राहीला पर्याय प्राणत्यागाचा तर त्याने काही फरक पडला का? हे मेल्यावर कसे कळणार? आणि असेही नाही की आजवर अपमानित होऊन कोणी आत्महत्या केलेली नाही!!
त्यामुळे पर्याय काय असेल मला कळत नाही....😓
बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.
No comments:
Post a Comment