Thursday 23 August 2018

भटके विमुक्त आंदोलनः एक दिशा

भटके विमुक्त आंदोलनः एक दिशा

मित्रांनो मला कळत नाही...
राज्यात व देशात भटक्या विमुक्तांच्या (Nomadic and Denotified Tribes) मोजता येणार नाहीत एवढ्या संघटना आहेत. त्यांचे मेळावे, चर्चासत्रे, परिषदा, चिंतन बैठका, कार्यशाळा व इतर अनेक उपक्रम विविध विषयांच्या अनुषंगाने होत असतात. मात्र भटक्या विमुक्तांच्या दृष्टीने सर्वात म्हत्वाचे असणारे मुद्दे जसे की , घटनात्मक दर्जा देऊन कायमस्वरूपी आयोग स्थापन करणे, एकतर स्वतंत्र्य DNT शेड्युल निर्माण करून अथवा ओबीसीचे विभाजन करून भटक्या विमुक्तांना पक्के म्हणजे घटनात्मक आरक्षण देणे या मुद्यांवर चर्चा जनजागृती, निवेदने देणे, संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून मागण्या का प्रखरतेने मांडल्या जाणे प्रचंड आवश्यक असुनही विशेष काही होताना दिसत नाही.
उच्च पदस्थांनी वरिष्ठ स्तरावर आयोगाच्या अमलबजावणीतील अडचणी व अडथळे समजून घेवून अधिकारी पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थिती अनुकूल करणे अत्यंत आवश्यक आहे. मला असे अजिबात म्हणायचे नाही की काहीच घडत नाहीये. आदरणीय इदाते दादा, रेणके आण्ण, श्री हरिभाऊ राठोडजी प्रयत्न करताना दिसत आहे. किमान राज्य पातळीवर तरी हक्क परिषद प्रश्नांची व्यवस्थित मांडणी करताना, जनजागृती करताना व मागण्यांचा तसेच आश्वासनांचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. मात्र मी नम्रपणे म्हणू शकतो की चळवळीचे हे प्रयत्न अपुरेसे आहेत.
मला तर कधी कधी वाटते की सरकारला आयोगाला व इतर घटनात्मक तसेच स्वायत्त संस्था ते अगदी सर्वोच्च न्यायालयाला आपल्या प्रश्नांची तिव्रता समजते आहे पण आपल्याला नाही! कारण आपले प्रश्न रास्त न्याय्य व नैतिक आहेत. आपल्या प्रश्नांमध्येच सत्यता करूणता आहे. म्हणून ते गंभीर आहेत पण आपण नाही!!! याला अज्ञान म्हणावे की बेफिकीरी??
इदाते आयोगाचा अहवाल अद्याप जनतेसाठी खुला केलेला नाही तो करावा ही मागणी होत नाही. निवडणुकांपुर्वी इदाते आयोग लागु कराच यासाठी आपापल्या पद्धतीने सामोपचाराने वा दबाव आणुन प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा निवडणुका झाल्या की संपले. तोवर इदाते आयोग जुना होणार व मग जे रेणके आयोगाचे झाले तेच इदाते आयोगाचे होणार ही साधी बाब लक्षात येऊ नये??? अरे बाबांनो सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने मात्र एक सामाईक कार्यक्रम तयार करून त्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करा, लोखंड गरम आहे तोवरच हातोडा मारा नाही तर मग.....? अब पछताए होत क्या जब चिडीया चुग गई खेत..
आणि मग मी व माझ्यासारखे असेही म्हणतील की काय उपयोग एवढ्या सा-या संघटना असुन????

बाळासाहेब धुमाळ🙏
9673945092

No comments: