Thursday 23 August 2018

द्वेष में हरी बिसरायो

द्वेष में हरी बिसरायोः

द्वेष में हरी बिसरायो
भूल के निज को जनम गवायो।
आएगा जब रे बुलावा हरी का
छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा।।

काल परवा जयललिता गेल्या आज करूणानिधी गेले! दोघेही दिग्गज राजकारणी. हयात असताना परस्परांचे कट्टर राजकीय हाडवैरी!! मुख्यमंत्री पदाचा वापर दोघांनीही परस्परांना शह देण्यासाठी पुरेपूर केला. मात्र आता दोघेही कायमचे शांत झाले.

तसे पाहता हे शत्रुत्व देखील आता संपायला हवे होते. मात्र करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यास अण्णा द्रमुक सरकारनं परवानगी नाकारली, जिथे आम्मांवर दफन विधी झाला होता. अखेरीस हा वाद मद्रास हायकोर्टात गेला व मग हायकोर्टाने करुणानिधींच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यविधी होईल, असा निर्णय दिला. किती हे शत्रुत्व!! मात्र शेवटी दोघेही एकाच बीचवर तेही शेजारी शेजारीच माती आड गेले!

त्यामुळे आपण सर्वांनी एवढेच लक्षात घेतले पाहीजे की सत्ता, शासन, संपत्ती असो अथवा शक्ती, सौंदर्य, बुद्धिमत्ता, लोकप्रियता असो काहीच कायम स्वरुपी नाही. ज्याला आपण दुपारची सावली म्हणू शकतो, जी टिकवून राहात नाही, असे आहे सर्व. निव्वळ क्षणिक आणि मिथ्या.

त्यामुळे याचा दुरूपयोग करणे, अति गर्व वा अहंकार करणे सोडून मानवतेचा अंगिकार केला पाहिजे. न्याय निती मुल्ये पुण्ये सहकार्य सहानुभूती स्विकारून योगायोगाने लाभलेल्या मनुष्य जन्माचे सार्थक केले पाहिजे.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, छळ, पाखंड, शोषण, अपहरण, दुराचार, व्याभिचार, कुआचार, कुविचार हे राक्षसी वा दानवी गुण आहेत. ते जोपासले तर आपण मनुष्य कसे काय म्हणवले जावू शकतो??

तेव्हा जिवनात मित्रत्व जोपासून प्रेम मिळवायचे की शत्रुत्व जोपासुन तिरस्कार मिळवायचा हे आपण ठरवायला हवे. मित्रत्वाचा सुगंध येतो तर शत्रुत्वाचा दुर्गंध. मित्रत्व शितल असते तर शत्रुत्व प्रखर! असो, दोन्हीही महान नेत्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
🌷🌷

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092

No comments: